Archive for अवांतर बडबड….

बालगीत-चिमणी

गरीब बिचाऱ्या चिमणीला,                                             
सगळे टपले छळण्याला,                                        
चिमणीला मग राघू बोले,                                                   
का गं तुझे डोळे ओले ?         

eurasian_tree_sparrow1.jpg                                             

काऽऽय सांगू बाबा तुला,
एकटे पणा छळतो मला !
राघू होता हुशार फार,
त्याने दिले सल्ले चार !

“झाडां वरती फिरून यावे,
गाणे गोड गावून यावे.
बाजूला मग जाऊन यावे,
गप्पा टप्पा मारून यावे,”

राघूच्या सल्ल्याने चिऊताई खूश झाली- खालच्या साळूबाईंशी गप्पा मारायला गेली.

साळू बाई, साळू बाई;
कसली तुमची नेहमीच घाई ?
शेजारी जरा बसाहो ताई,
तक्रार माझी फार नाही.

नाही गं बाई, चिऊताई,
बसायला मला वेळच नाही,
शाळेची तयारी करायची घाई,
त्यातच छोटूचा गणवेश नाही,

वह्या पुस्तके आणायची बाकी
कव्हर्स त्यांना घालायची खाकी
होतील आता पिल्ले गोळा,
करते हं मी त्यांच्या पोळ्या.

चिमणी ती मग हिरमुसली
झाडा वर जाऊन बसली
तिकडून आला चिमणा छान
होता तो खूप गोरा पान.

 housesparrow1.jpg

येते का गं फिरायला,
गोड गाणी म्हणायला.
झाडांवरती फिरून येऊ
गोड गाणी गाऊन येऊ.

चिमणी आमची खुशीत आली                                  
गाणे गोड गाऊ लागली
झाडां वरती फिरू लागली,
चिमण्या संगे भुर्र उडाली.

टिप्पणी करे

एक पाढा नोकरीचा !

मराठी नोकरदार वर्गाचा एक पाढा-

नोकरी एके नोकरी…..

नोकरी दुणे बायको……..

नोकरी त्रीजे मुले………..

नोकरी चौके कर्ज…….

नोकरी पाचे घर…..

नोकरी सक स्कुटर…..

नोकरी साते नाटक…….

नोकरी आठे एफ.डी. …….

नोकरी नवे भांडण ……..

नोकरी दाहे नोकरी-

Comments (1)

ह्या साहित्यिकांना सलाम !

एका वृत्तपत्राच्या पुरवणी मध्ये नुकतेच ट्रकच्या मागील काही मजेदार वाक्यांचा संग्रह वाचण्यात आला आणी अचानक मी वाचलेल्या काही वाक्यांची आठवण आली. काही वाक्ये त्या लेखांत होतीकाही मी पाहिलेली आठवतातत्यांचीच सरमिसळ आज मनोगतींसाठी…..* ही खूण केलेला संदेश त्या वृत्तपत्रातला आहे.
***********************************

ट्रक किंवा रिक्शाच्या मागील साहित्य हे कधी हसवणारे असते, कधी विचार करायला लावणारे असते तर कधी पांचट पणाचा कळस असते…..
काहीही असो, नवनवीन कल्पनाविविध शेरोशायरीने भरपूर असे हे साहित्य हिंदीतच असतेकारण ट्रक (त्यांच्या भाषेत लाइनवरचा !) भारतभर फिरतो. पंजाबचा ट्रक गुजरातेत तर आसामचा कर्नाटकात बघायला मिळणे नावीन्यपूर्ण नाहीच !
ट्रकवर काय काय शेर लिहिलेले असतात ते त्यांच्या मागे गाडी वा दुचाकी चालवताना वाचता येते
लहानपणी समोरून रिक्शा आली की तीच्या मागे काय लिहिले आहे हे ओळखण्याचा आमचा एक खेळ होता.
एका रिक्शाच्या मागे-“आलोच हं !” असे लिहिले होते ते वाचून मालकाच्या कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागेल…. घेतलेले भाडे सोडून येतोच तुम्हाला न्यायला हे एका शब्दात योग्य तो परिणाम साधणारे होते.
असेच एक वाक्य रिक्शाच्याच मागे होते…. ‘येता की जाऊ ?’
एकीच्या मागे लिहिले होते…. “तुमने दि आवाज और मै गया !”

कित्येक सरकारी फतव्यांमध्ये वाहनांच्या मागे बोधपर संदेश लिहिणे सक्तीचे आहे. “दो या तीन बस्स !” चे आजएक मूल सुंदर फुलझाले आहे.
शिकेल तो टिकेलमुलींच्या शिक्षणा वरीलमुलगी शिकली प्रगती झालीते बाल मजुरी विरोधी बरीच वाक्ये वाहनांच्या पाठी दिसतात.
.रा... च्या एका बसवरतुम्ही वाहून नेता केळी नी कणसं; आम्ही मात्र लाख मोलाची माणसं !” असे लिहिल्याचे मला आठवते.
ह्याने लोकजागृती होते की नाही हा वेगळा वादाचा विषय असू शकेल पण मला एक चाळाच आहे कुठलाही ट्रक दिसला रे दिसला की त्याच्या मागचाडायलॉगवाचायचामग कधी कोणी बरोबर असले की बरोबरीने त्याचा आस्वाद घ्यायचा नाहीतर एकटेच मनांत दाद द्यायची……. आता ट्रक च्या पाठी लागू ……..

काही किलो किलोचे भारी शेर सांगतो…..हिंदीत लिहावेच लागणार म्हणून माफ करा हं !
मेरा भारत महानहे वाक्य बहुदा सर्व ट्रकवर असायचेच ! जेंव्हा हे वाक्य लिहिण्याची सक्ती ( होय सक्ती ! ) रिकामं टेकड्या ऑफिसर्स कडून (आर.टी..) झाली तेंव्हा तो स्व. राजीव गांधींचा फतवा असल्याचे ऐकीवात होते…..
पुढेमेरा भारत महानवर कित्येक जोक्स तयार झाले पण आजही ते वाक्य प्रत्येक ट्रकच्या मागे हमखास असते. त्यावरचा एक भारी शेर ……

*                  दिवाली मेया अली‘ ~ मुहर्रम मे राम…..
                  इसलिये तो कहते है ~ मेरा भारत महान !
दिवाली, अली, राम, मुहर्रम ह्यांचा अर्थाअर्थी काय संबंध ?
पण अडाणी ट्रकवाल्याच्या भावना हिंदू मुस्लिम ऐक्याच्या होत्या त्याचे कौतुक जास्त वाटले. ह्या सर्वांचा देशाशी संबंध जोडून त्याने स्वतः:चे देशप्रेम ह्या रीतीने दाखवून दिले.

ट्रकची
मागची बाजू वेगवेगळ्या रंगबिरंगी कथनांनी सजवलेली एका गड्डीच्या मागे लिहिलेले होते ते वाचून ..मु.वळली.-
देखता क्या है ? मेरा पिछवाडा तेरे पिछवाडे से रंगीन है !” आता बोला !

ट्रकचालक
नेहमीच दारुडे असतात हा समज एकाला पचलेला नव्हता. त्याने स्वतः:च्या ट्रकच्या मागे लिहिलेले
तितलियॉं रस पिती है, भवरें बदनाम होते है
दुनिया शराब पिती है; ‘डिरायवरबदनाम होते है

*काही आकड्यांचे खेळ-
१३ मेरा ७, 
मेड 4 U,
(हृदयाचे चित्र) २०,१३,८०,२०,१३.-
म्हणजे पंजाबीत दिल वी तेरे अस्सी वी तेरे (हृदय पण तुझेच मीही तुझाच).
एक नमुनाहौरन बजाओ शौक सेसाइड दुंगा अगली चौकसे
तर काही काही स्पष्टवक्ते असतातजगह मिलने पर साईड दिया जायेगा “*
एकाने तरपंगा मत लेना ~ मेहंगा पडेगा अशी वॉर्नींगही मागे लिहिलेली….
एका वर लिहिलेलेनेकी कर जुते (बुटाचे चित्र) खा मैने खाये तू भी खा “*
मालिक की मेहनत, डिरायवर का पसिना….
देखो शानसे चली कैसी ये हसीना मालकाला मस्का
सेठ बडा दिलदार है पर चमचोंसे परेशान है असे आपल्या मालकाबद्दलचे वाक्यही वाचायला मिळेल….

स्वतःच्या गावाची ख्याती भारतभर पसरवणारा एक संदेश….
निम का पेड चंदन से क्या कम है ?
मेरा गांवअंबालालंडनसे क्या कम है ?”*

बॉर्डर सिनेमा आल्या नंतरघर कब आओगेह्या वर बरीच कवने वाचली आहेत (नेमकी आजच आठवणार नाहीत.) गुढघ्यांत मान घालून बसलेल्या एका युवतीच्या चित्रा बरोबर एक कवन लिहिले होते…….
मेरी जान मेरा इंतजार मत करना
मै मुसाफिर हूं मेरी राह मत ताकना

महिनों महिने घरा बाहेर राहणाऱ्या ह्या ट्रक ड्रायव्हर्सचे जीवन खडतर असतेच वर जीवाचा धोका,
घराची/कुटूंबाची काळजी,
मुलाबाळांच्या शिक्षणा कडील स्वतःचे दुर्लक्ष तसेच भविष्याची चिंता ह्या सर्व विषयांपासून वेगळा असा विचार आपल्या ट्रकच्या मागे लिहून आपल्या सारख्यांचे मनोरंजन करणाया ह्या साहित्यीकांना मनोमनसलाम !”

Comments (2)

पत्रकारांचे उद्योग धंदे….

चिपकू पत्रकारांची एक जमात परवाच्या पेपरांत बघायला (म्हणजे वाचायला) मिळाली! ह्या वेळी “स्टींग ऑपरेशन” करायचा प्रयत्न केला गेला तो खुद्द पाटलांचाच ! घ्या …. म्हणजे गृहमंत्र्याला असा अडकवला की आपल्याला जे हवे ते त्याच्या कडून उकळायला बरें ! धन्य ती पोरगी व तीच्यावर झालेले संस्कार !

वॉटरगेट- सारखी प्रकरणे किंवा अरुण शौरी सारखे पत्रकार इतिहास जमा झालेत असे वाटण्या इतपत आजची परिस्थिती ह्या पीत पत्रकारितेने निर्माण केली आहे ! 

पत्रकार काय कुठेही काहीही करू शकतात. वैद्यकीय क्षेत्रातले एक माझ्यासमोर घडलेले उदाहरण देतो –

एका पापभीरू डॉक्टरला सतत फोन यायचे – तुम्ही रुग्णांना नको त्या चाचण्या करायला भाग पाडत आहात- तुमच्या बद्दल पेपर मध्ये मी लिहिणार आहे. एक दोन वेळा त्या डॉक्टरांनी त्या फोन करणाऱ्याला ‘आम्ही तसे काही करीत नाही’ असे पटवण्याचा प्रयत्न केला. तरी अधून मधून हे फोन येणे चालूच राहिले शेवटी कंटाळून त्यांनी अंधरीच्या डी.एन.नगर पो.स्टे. ला तक्रार दिली – सापळा लावून पत्रकाराला पकडला- निव्वळ पैशांसाठी आपल्या पत्रकारितेचा उपयोग (?) करणारे हे महाशय केवळ डॉक्टरांच्या चांगुलपणा मुळे सुटले.

PRESS ची पाटी लावून अवैध मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणारी वाहने ह्यांचीच. पकडले गेल्यावर ”प्रेस म्हणजे अमुक तमुक प्रिटींग प्रेस हो” असे सांगायला ही मंडळी कमी करीत नाही !

कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवणारी ही पत्रके व त्यांचे पत्रकार पाहिले की समाजातल्या ह्या वर्गाची दया येते….. बिच्चारे पोटा ची खळगी भरण्यासाठी प्रामाणिकपणा सोडून काय काय करावे लागते ह्यांना !

पाटलांचे नशीब थोरं – वेळीच सावध झाले नसते तर फुकाच्या सापळ्यात अडकले असते-   

टिप्पणी करे

९८.३ FM !

९८.३ FM कधी ऐकले आहे का ?
‘फूल-टू-टाईमपास’ असतो. तसं म्हणायला गेलं तर् आधी सुद्धा ‘विविध भारती’ वर वेगवेगळे गाण्यांचे कार्यक्रम सादर व्हायचे व दोन गाण्यांच्या मध्ये त्या गाण्याची फर्मायीश कुणी केली ते सांगीतले जायचे,गीतकार-संगीतकार-सिनेमाचे नांव,   गायक व काही वेळा त्या गिता बद्द्लच्या आठवणी !
बहूतेक ‘झुमरूतलय्या’ वरून सर्वांत जास्त फर्माईशा यायच्या – जणू काही तिथल्या लोकांना गाण्याशिवाय करमायचेच नाही… वेगवेगळ्या कार्यक्रमांना नांवेही मजेदार असायची. ‘गीत नये पुराने”सुहाना सफर’ ‘बेला के फूल”छायागीत’फौजीभाईयोंके लिये’ वगैरे वगैरे…..

ह्या ९८.३ FM ची ‘बातही कुछ और है’- दोन गाण्यांच्या मध्ये दुरदर्शन च्या मालीकांच्या जाहीराती, लोकांच्या समस्यांना ऊत्तरे व असेच काही.

आजचीच गंमत पहा….
“विद्याविहार की शीलाजी का केहना है, उन्हे उनके ससूर और सांस बहोत तंग करते है” त्यावर जालीम ऊपायही तेच सुचवितात….
“शीलाजी आप अपने पतिदेव के पिछे पडकर वोह मकान छोड दिजीये, या तो अपनी सहेलीयोंको आपके समर्थनके लिये घर पर बूला लिजिये ताकी वो आपकी कोई मदत जरूर करेंगी, अगर कुछ नही हुआ तो ईतना हायतोबा मचा दिजिये की आपके सास ससूर घबरा जायंगे, नही तो…ब्ला ब्ला ब्ली ब्लू ब्ले ब्लो…….” 

गाणे बदलते….एका कडव्यातच संपते !…
परत जाहीरात…सास भी कभी बहू वगैरे वगैरे….
मग येतात एक मनोविषेशज्ञ – त्यांना विचारले जाते…. “डॉक्टर, मेरा लडका हुशार तो बहूत है और क्लास मे अव्वल नं से आगे भी आता है पर-वो ओठ चबाता है और कभी कभी खुद को काटता है….”
डॉक्टर;- ” अक्सर जरुरत से ज्यादा लाड प्यार से बच्चोंमे यह होता है – उसका ध्यान पढाई के अलावा और भी कहीं लगाओ…उसे नये खिलौने लाके दो…. वगराह वगराह….

असें पुरण हवेच का मध्ये मध्ये ? की आपल्या ‘विविध भारती’ वरच्याच गाण्यांच्या मधील “फन डू आठवणी” छान होत्या ?
आता गाण्यांची चाल बदलली, झुमरुतलैय्या ची नांवे बदलली व आवडी ही बदलल्या पण काही म्हणा ही रेडीयो मिर्ची ९८.३ FM काही जमत नाही बुवा अपल्याला !

टिप्पणी करे